मानव-वन्यजीव संघर्ष, वनसंपदा संवर्धन आणि स्थानिक रोजगाराच्या प्रश्नांवर चर्चा
गडचिरोली, दि. १९ ऑगस्ट :
गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी मंत्रालय, मुंबई येथे महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन गडचिरोली जिल्ह्यातील वन विभागाशी संबंधित विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी जिल्ह्यातील वनसंपदा, वन्यजीव संरक्षण, मानव-वन्यजीव संघर्ष तसेच स्थानिक रोजगारनिर्मितीच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.
गडचिरोली जिल्ह्यात वाघ आणि हत्तींच्या वावरामुळे मानव-वन्यजीव संघर्षाचा प्रश्न गंभीर होत असल्याने त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी आमदार डॉ. नरोटे यांनी केली. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांचे जीवित तसेच शेतीचे नुकसान होत असल्याने विशेष कृती आराखडा तयार करण्याची गरज त्यांनी मांडली.
हत्ती व्यवस्थापनासाठी स्थानिक युवकांना प्रशिक्षण देण्याची मागणी
हत्ती व्यवस्थापनासाठी स्थानिक युवकांना प्रशिक्षण देऊन स्थानिक पथके तयार करण्याची योजना राबवावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. स्थानिक पातळीवर प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध झाल्यास वन्यजीवांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करण्यास मदत होऊ शकते.
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना मिळणारी भरपाई वाढवून ५० लाख रुपयांपर्यंत करावी, तसेच मृतांच्या वारसांना नोकरी देण्याबाबतही मागणी करण्यात आली.
वनसंपदेतून स्थानिक रोजगारनिर्मितीवर भर
गडचिरोलीची वनसंपदा ही स्थानिक रोजगारनिर्मिती आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वाची संधी असल्याचे नमूद करण्यात आले. वनआधारित उद्योगांना चालना देताना स्थानिक नागरिक, बचत गट आणि उद्योजकांना अधिकाधिक सहभागी करून घेण्याबाबतही चर्चा झाली.
याशिवाय फॉरेस्ट डेपो परिसरात वॉकिंग ट्रॅक, चामोर्शी (सोनापूर) येथे इको पार्क, सेमाना उद्यानाजवळ बायोडायव्हर्सिटी पार्क व प्राणीसंग्रहालय तसेच वन्यजीव उपचार आणि पुनर्वसनासाठी ट्रान्झिट सेंटर उभारण्याच्या प्रस्तावांवरही चर्चा करण्यात आली.
गडचिरोली जिल्ह्यातील वनसंपदा संवर्धनासोबतच नागरिकांचे संरक्षण, स्थानिक रोजगार आणि वनआधारित विकासाला चालना देण्यासाठी पुढील काळातही पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी सांगितले.
अवैध दारू व्यवसायाविरोधात धानोरा पोलिसांची कठोर कारवाई! – InfoNewsUpdate24
Click Here For More Info
- ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची हजेरी आता बायोमेट्रिकद्वारे
- गडचिरोली ग्रामीणसाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची मागणी; शहीद स्मारक उभारण्याचाही प्रस्ताव
- गडचिरोली कृषी महाविद्यालयातील प्रश्नांसाठी मिलिंद नारोटे यांची कृषिमंत्र्यांची भेट
- गडचिरोलीच्या वनविषयक प्रश्नांवर आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची वनमंत्री गणेश नाईक यांची भेट
- आकस्मिक निधन झालेल्या शिवसेना बीएलए प्रमुखाच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची हजेरी आता बायोमेट्रिकद्वारे
४०१ अधिकाऱ्यांची जीपीएस-बायोमेट्रिक हजेरी; उपस्थितीवर प्रशासनाची थेट नजर गडचिरोली (जि. गडचिरोली), दि. २० ऑगस्ट :…
गडचिरोली ग्रामीणसाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची मागणी; शहीद स्मारक उभारण्याचाही प्रस्ताव
आमदार डॉ. मिलिंद नारोटे यांची राज्यमंत्री पंकज भोयर यांची मंत्रालयात भेट; शिक्षण व्यवस्थेतील प्रलंबित प्रश्न…
गडचिरोली कृषी महाविद्यालयातील प्रश्नांसाठी मिलिंद नारोटे यांची कृषिमंत्र्यांची भेट
अतिरिक्त तुकडी, नवीन अभ्यासक्रम, पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या समस्यांवर तातडीने कार्यवाहीची मागणी गडचिरोली, दि. १९…
गडचिरोलीच्या वनविषयक प्रश्नांवर आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची वनमंत्री गणेश नाईक यांची भेट
मानव-वन्यजीव संघर्ष, वनसंपदा संवर्धन आणि स्थानिक रोजगाराच्या प्रश्नांवर चर्चा गडचिरोली, दि. १९ ऑगस्ट :गडचिरोली विधानसभा…
आकस्मिक निधन झालेल्या शिवसेना बीएलए प्रमुखाच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
मनोज कोवासे यांच्या कुटुंबीयांना धीर देत शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून आर्थिक मदत एटापल्ली (जि. गडचिरोली), दि. १९…
मानेवारा जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या कामकाजाची चौकशी करा; ग्रामपंचायतीची मागणी
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी दोष आढळल्यास शिक्षकावर कारवाई करून तात्काळ नवीन शिक्षक नियुक्त करण्याची मागणी…

