🚧 एटापल्ली-आलापल्ली मार्ग ठप्प ! जुना पुल खचला, नवीन पूल अपूर्ण – नागरिकांचे हाल
एटापल्ली (जि. गडचिरोली) | प्रतिनिधी – एटापल्ली-आलापल्ली मार्ग ठप्प ! मुख्य रस्त्यावर असलेला जुना पूल नुकताच खचल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी नवीन पुलाचे काम सुरू असले तरी ते अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे नागरिकांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.
पावसाळ्याच्या तोंडावर ही परिस्थिती निर्माण झाल्याने रुग्णवाहिकांना अडथळा, विद्यार्थ्यांचे शिक्षण, शेतकऱ्यांचे उत्पादन आणि व्यापाऱ्यांचा व्यवसाय या सगळ्यावर परिणाम झाला आहे. नागरिकांचा उद्रेक होऊ लागला असून प्रशासनाच्या हलगर्जीपणावर संताप व्यक्त केला जात आहे.
काम रखडल्याने वाढतोय धोका…
सदर पुलाच्या कामात होत असलेला विलंब आणि खचलेला जुना पूल यामुळे परिसरात जीवितहानीचा धोका निर्माण झाला आहे. स्थानिक रहिवासी मनिष दुर्गे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार सादर करून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
नागरिकांची मागणी खालीलप्रमाणे आहे:
- अपूर्ण नवीन पूल तात्काळ पूर्ण करावा.
- खचलेल्या पुलाची चौकशी व्हावी.
- दोषी कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी.
- वाहतुकीसाठी सुरक्षित पर्यायी व्यवस्था त्वरित उपलब्ध करावी.
सार्वजनिक बांधकाम विभागाची भूमिका संशयास्पद…
या सर्व घडामोडींमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदाराची भूमिका दृष्टिक्षेपात येत आहे. जनतेच्या जीवाशी खेळ करणाऱ्या या व्यवस्थेविरोधात आता आवाज उठवण्याची वेळ आली आहे, असे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
➡️ प्रशासनाने याची तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
For More Info Visit :- Click here